अमानुष

काल टीवी वर बातमी बघितली - मनमाड जवळ नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना भेसळखोरांनी जिवंत जाळले. मन सुन्न झाले. काय म्हणावे अश्या अमानुष कृत्त्याला!

एक सरकारी अधिकारी कर्तव्यदक्षता दाखवून पेट्रोलमध्ये होत असलेली भेसळ रोखण्याचा प्रयत्न करतो आणि ते गुंड त्यांना जिवंत जाळून ठार मारतात. कदाचित असे कृत्य करत असताना गुन्हेगारांना ठाऊक असते की त्यांना अभय मिळणार आहे. त्यामुळे ते अशी कृत्य करताना कचरत नाहीत.

इतर वेळेस आपण ओरड करतो की सरकारी अधिकारी कर्तव्यदक्षता दाखवत नाहीत म्हणून. परंतु ज्यांनी धाडसाने कर्तव्य बजावायचा प्रयत्न केला त्यांन त्याचे हे फळ मिळावे. राज्यातल्या कायदा आणि सुवूवास्थेची शोकांतिका म्हणायला हवी.

अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्यांना जिवंत जाळले त्यांच्या मागे बायको आणि २ मुली आहेत. सरकारने तत्परतेने २५ लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देऊ केली आहे. पण त्या बाईचा नवरा आणि मुलींचे वडील तर परत येऊ शकत नाहीत.

आणि जे अधिकारी कर्तव्यांची जाणीव ठेवून काम करू इच्छितात त्यांच्या मनात कायम हे भय असणार की कदाचित आपणही ह्या गुंडाराजचे बळी ठरू शकतो. मग त्या व्यक्तींनी सचोटीने काम कसे करावे? 

यशवंत सोनावणे (अतिरिक्त जिल्हाधिकारी) ह्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि अमानुषतेची विषवल्ली अजून फोफावू नये हि देवाचरणी प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)