गैरहजेरी

इतक्या दिवसांची माझ्या ब्लॉग वरची गैरहजेरी...  मनात खूप काही चालू होतं. माझ्या ब्लॉगच्या  नावाप्रमाणे बरेच तरंग उठत होते पण ते इथपर्यन्त पोहोचलेच नाहित.  जसं समुद्रातली प्रत्येक लाट काठापर्यन्त पोहोचत नाही तसंच काहीसं झालं. 

रोज सकाळी सकाळी ६:३० च्या आधीचा वेळ माझा स्वतःचा असतो. मग स्वयंपाक करता करता बरेच विचार येत असतात डोक्यात. मग असं वाटतं की हे आपण ब्लॉगवर नक्की लिहायला पाहिजे. पण दिवस संपता संपता जेव्हा ब्लॉग वर लिहायची वेळ येते तेव्हा ती ऊर्मी संपलेली असते किंवा तेवढी पुरेशी नसते.  एक तर पोस्ट लिहायला पण घेतली पण ती अजून अर्धवट अवस्थेमधे आहे.  

आज पण आत्ता जेव्हा ही पोस्ट लिहायला घेतली तेव्हा नक्की काय लिहावे हा प्रश्न होता. पण विचार केला की निदान लिहायला तर सुरुवात करावी मग बघू काय होतं ते. आणि झालंही तसंच. काही तरी लिहावं हा विचार करून सुरुवात केली.

ही पोस्ट म्हणजे इतक्या दिवसात काही न लिहीण्याचे जे चक्र सुरु झाले होते ते संपवणारी असावी ही आशा.  

Comments

  1. काही न लिहीण्याचे तुमच चक्र लवकरच संपो....

    ReplyDelete
  2. prayatna tar toch asanaar aahe... :)
    (Kiti adnyan te majha. marathi madhe comment kashi post karavi tech kalat naahi)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

इस मोड से जाते हैं .... (१)

कथा - भिंतीवरील चेहरा

इस मोड से जाते हैं .... (२)